Showing posts with label Shivsena. Show all posts
Showing posts with label Shivsena. Show all posts

Thursday, August 28, 2008

मराठी पाट्या लावा

महाराष्ट्रात लातूरला भूकंप झाला, तेव्हा भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा हात आखडता घेणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्यांनी जेव्हा भूजमध्ये भूकंप झाला, तेव्हा मात्र तेथे भरभरून मदत केली, मग महाराष्ट्र व गुजरात असा भेदभाव का, असा परखड सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बुधवारी उपस्थित केला.

मराठी पाट्या लावण्यासाठी आता फक्त एकच दिवस शिल्लक आहे, पाट्या बदलल्या नाहीत तर परिणामांना सामोरे जा, असा अंतिम इशाराही त्यांनी दिला.गेल्या काही दिवसांपासून मराठी पाट्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यातच काल मनसेने व्यापाऱ्यांची सभा उधळून लावली होती. या पार्श्‍वभूमीवर मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध राज ठाकरे यांनी चौफेर हल्ला चढविला.

महाराष्ट्राची राजभाषा मराठी असावी, हा १९६१ चा कायदा आहे , तरीही राज्याच्या भाषेसाठी कोर्टात जावे लागते यासारखे दुर्दैव नाही. भाषेसाठी कोर्टात जाणारे कुठलेही राज्य या देशात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.


तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी कायदा आमच्यामुळे झाला असून, मनसेने त्याचे श्रेय घेऊ नये, असा इशारा दिला. मराठीचा आग्रह योग्य असला, तरी त्यात पक्षीय राजकारण आणणे योग्य आहे का? या सर्वांत तुम्ही कोणती भूमिका घ्याल? आम्हाला येथे नक्की कळवा...

Wednesday, March 21, 2007

Is This Hypocracy? Or Just Politics?

पवारांशी असलेल्या जुन्या मैत्रीचा दाखला देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यापुढे पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला। याआधीच आम्ही एकत्र आलो असतो, तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे घडले असते व पवार पंतप्रधानही होऊ शकले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्‍त केली...
शिवसेनेच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीचा महापौर झाल्याबद्दल पत्रकारांनी प्रश्‍न विचारला होता. त्यावर बोलताना बाळासाहेब म्हणाले, की शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती करण्याला आपला विरोध नाही. याआधीही पवारांकडे याबाबत विचारणा केली होती. पवारांपुढे मैत्रीचा हात पुढे केला होता; मात्र त्या वेळी त्यांनी आपल्या सूचनेकडे दुर्लक्ष केले होते. पवार हा उमदा माणूस आहे; मात्र ते कधी काय डावपेच खेळतील हे सांगता येत नसल्याचेही ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादीशी युतीबाबत भाजपला विश्‍वासात घेतले होते का, असे त्यांना विचारले असता आपण सगळ्याच गोष्टी भाजपला विचारून करीत नाही, असा टोला त्यांनी लगावला..