Showing posts with label Congress. Show all posts
Showing posts with label Congress. Show all posts

Tuesday, August 19, 2008

राणे कॉंग्रेस सोडणार?

कॉंग्रेसमध्ये एकाकी पडलेले महसूलमंत्री नारायण राणे आता पक्षातूनही बाहेर पडणार का, अशी चर्चा सध्या सुरू असून, "आता राणे फार काळ पक्षात राहत नाहीत,' अशी प्रतिक्रिया ऐकू येत आहे. येत्या दहा-पंधरा दिवसांतच याबाबतची हालचाल अपेक्षित असल्याचा अंदाज पक्षात व्यक्त होत आहे.

पक्षश्रेष्ठींनी देऊ केलेल्या "शेवटच्या संधी'वरही राणे यांच्याकडून प्रतिसाद न आल्याने आता ते कॉंग्रेसचे कमी दिवसांचेच सोबती राहिल्याचेही बोलले जात आहे. राणे यांना पक्षात सामावून घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या पातळीवरूनही अनेक प्रयत्न करण्यात आले होते. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षपद त्यांना देऊ करण्यात आले होते; पण त्यांनीच ते नाकारले होते. त्यानंतरच त्यांना प्रदेश प्रचार समितीचे अध्यक्षपद देऊ करण्यात आले आणि त्याबाबतही त्यांनी फारशी अनुकूलता दाखविली नाही. राणे यांनी त्यांचा हट्टीपणा सोडावा, यासाठी कॉंग्रेस अध्यक्षांचे राजकीय सचिव अहमद पटेल, महाराष्ट्राच्या प्रभारी सरचिटणीस मार्गारेट अल्वा, राणे यांना कॉंग्रेसमध्ये आणण्यात मोठी भूमिका बजावणारे बाळासाहेब विखे-पाटील यांनीही त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न केले. अगदी राणे यांनी दिल्लीस दिलेल्या शेवटच्या भेटीच्या वेळीही त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता; पण राणे यांनी भूमिकेत बदल केला नाही.

आता राणे पक्षात व सरकारमध्येही एकटे पडले आहेत. त्यामुळे त्यांचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता त्यांच्या पुढील हालचालींचा अंदाज घेतला जात आहे; परंतु राणे आता फार काळ पक्षात राहणार नाहीत, असेच त्यांच्याबद्दल ठामपणे बोलले जात आहे. राणे कदाचित आपला एखादा वेगळा पक्ष काढतील, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. "ते' भाकीत खरे ठरणार?

Saturday, June 21, 2008

दिशाहीन पक्षबांधणीमुळेच कॉंग्रेसमध्ये हुल्लडबाजांचे धाडस

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉंग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यातील हुल्लडबाजीचे तीव्र पडसाद उमटत असून, या गटबाजीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.विलासराव देशमुख आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय संघर्षातून हा प्रकार घडल्याचा आरोप होत असला, तरी राज्यातील दिशाहीन पक्षबांधणी हेच त्याचे मूळ असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.

गोरेगावच्या एनएसई संकुलातील हा कार्यक्रम जाहीर सभा नव्हे, तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या हजेरीतच घोषणाबाजी होऊन गटबाजीचे जाहीर प्रदर्शन झाल्यामुळे कॉंग्रेसच्या शिस्त आणि संस्कृतीलाच धक्का पोचला, असे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने व्यथित होऊन सांगितले.

देशमुख-राणे यांच्यातील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्या विरोधातील नाराजीलादेखील तोंड फुटण्याचे सूचित होऊ लागले आहे.

कॉंग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपली नाराजी अशाप्रकारे हुल्लडबाजी करून बाहेर काढणे योग्य आहे का? लिहा सकाळ ब्लॉगवर..

Monday, October 22, 2007

आरती "रामा'ची



- नवी दिल्लीतील सुभाष मैदानात रविवारी विजयादशमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राम व लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या कलाकारांना ओवाळताना संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी।
न सांगता, बरंच काही बोलतोय हा फोटो...नाही का...?

Tuesday, January 30, 2007

Satyagraha Centenary - By Invitation Only?


100 years have passed since Gandhiji raised this tool of Satyagraha against mighty British Raj. The path of ideals which he shown ultimately led India to Independence. Bapuji who was a Mahatma for the whole Indian nation never did belong to any one person or caste or party. He was a Rashtrapita & did not need any such tags.
Unfortunately after his death, the Congress party has virtually tried to hijack everything that is represented by name of Bapuji. In the centenary celebrations to commemorate Satyagraha, Congress refused to invite BJP the chief opposition party in Parliament.

Isn't it shameful that in a function where many foreign dignitaries were invited, the chief opposition party is not invited?

Related News On eSakal
सत्याग्रहाला नवे परिमाण देणे गरजेचे - सोनिया