Thursday, August 21, 2008

सुशिक्षितांतील स्त्रीभ्रूणहत्येचे वाढते प्रमाण चिंताजनक

स्त्रीभ्रूणहत्येच्या वाढत्या प्रमाणामुळे सामाजिक असमतोलाची भीती निर्माण झाली असतानाच, हा प्रकार शहरी भागात आणि सुशिक्षितांमध्ये अधिक आढळून येत असल्याने चिंतेचा विषय बनला असल्याचे केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री रेणुका चौधरी यांनी म्हटले आहे.

स्त्रीभ्रूणहत्येप्रमाणेच घरगुती हिंसाचाराचाही प्रश्‍न गंभीर बनला असून, यास कारणीभूत ठरणाऱ्यांबरोबरच त्याकडे दुर्लक्ष करणाराही दोषी आहे, असे त्या म्हणाल्या.

शहरी नागरिकच अशाप्रकारच्या चुका करत असतील, तर ग्रामीण भागातील नागरिकांकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. स्त्रीभ्रुणहत्या हा गंभीर गुन्हा असतानाही अनेक सुशिक्षित नागरिक यात गुंतलेले दिसतात. त्यामुळे सर्वप्रथम सुशिक्षितांवर याचा वचक बसला पाहिजे.

No comments: