Friday, April 18, 2008

आदिवासी विद्यार्थ्यांची उपासमार

पोषण आहार बंद ः उपस्थिती रोदावअली

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिला जाणारा पोषण आहार ऐन परीक्षांच्या काळात तडकाफडकी बंद करण्यात आल्याने शहापूर तालुक्‍यात विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. शिवाय शाळेतील उपस्थितीवरही परिणाम होत आहे.

तालुक्‍यातील चारशे शाळांमध्ये पोषण आहार दिला जात होता. मात्र 1 एप्रिलपासून आहार देणे बंद करण्यात आल्याने गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. दुपारचे जेवण मिळत नसल्याने शाळेत जाण्याऐवजी गरीब मुले गावातील लग्नाच्या पंगतीत गर्दी करतात. त्यामुळे शाळेतील उपस्थिती रोडावली आहे. याबाबत विद्यार्थी सेनेचे तालुका संघटक सुरेश पाटील यांनी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्याद्वारे त्यांनी पोषण आहार बंदच्या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधले आहे.

ऐन परीक्षांच्या काळात पोषण आहार बंद केल्याने एकच गोंधळ उडाला आहे. पंचायत समितीचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. काहीही करा; पण धान्य उसनवारी घेऊन पोषण आहार सुरू ठेवा, असे तोंडी आदेश शिक्षकांना देण्यात आल्याचे समजते. मात्र कोणत्याही शाळेत अजून तरी पोषण आहार सुरू करण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आले.

अगोदरच अनेक संधीपासून वंचित असलेल्या या विद्यार्थ्यांचा आहार बंद करून जिल्हा परिषदेने शिक्षणविषयक उदासिनता दाखवून दिली आहे.

2 comments:

ASHISH BADWE said...

मिस वैशाली आदिवासी विद्यार्थ्यांचा पोषण आहार बंद करणे हे चुकीचे आहे प्रशासनाचा निर्णय चुकीचा आहे. - आशिष बडवे, पांढरकवडा
www.dainikyavatmalnews.com
www.vidarbhanews.blogspot.com
www.newsindiapress.blogspot.com
www.pressindia.wordpress.com
www.newsindia.sulekha.com
Email - ashishbadwe@gmail.com
Contact - 09403455960

Anonymous said...

Aahar banda kela aahe pan sarkari nondit to chalu aasel aani sagale paise raajkarni mandali khaat aastil aani adivasi mule upashi.
Merea bharat mahan...aani pudhari-mantri tar aati mahan.