Wednesday, December 05, 2007

कनिष्ठ डॉक्‍टरांच्या संपामुळे आंध्रात 12 बालकांचा मृत्यू

हैदराबादमधील निलोफर सरकारी रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्‍टरांचा संप चिघळला, अन्‌उपचाराअभावी रुग्णालयातील 12 मुलांचा मृत्यू झाला. डॉक्‍टरांवर हल्ला करणाऱ्या आमदारास अटक करावी, या मागणीसाठी कनिष्ठ डॉक्‍टारांनी संप पुकारला आहे.

संपामुळे गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था पूर्ण कोलमडली असून, उपचाराअभावी दोन दिवसांत सुमारे 12 मुलांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या मुलांचा मृत्यू संपामुळे झालेला नाही, असा दावा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तथापि, रुग्णालयातील मुलांच्या मृत्यूची मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी गंभीर दखल घेतली असून, सरकारी रुग्णालयातील मुलांना खासगी रुग्णालयात हलविण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे आमदार अफसार खान व त्यांच्या समर्थकांनी गेल्या रविवारी निलोफर या लहान मुलांच्या सरकारी रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्‍टरांवर हल्ला केला होता. अशाप्रकारे डॉक्‍टरांवर हल्ला करणे अत्यंत चुकीचे आहे. पण, झालेल्या घटनेच्या निषेधार्थ संपावर जाऊन रुग्णांचे हाल करणेही तेवढेच अयोग्य. तातडीच्या सेवा देणाऱ्यांनी तरी संपावर जाण्यासारखी भूमिका घेऊ नये. मागण्या मान्य करून घेण्याचा अन्य पद्धतीही आहे...त्या पद्धतींचा अवलंब केला असता, तर बारा बालकांना प्राण गमवावे लागले नसते. या सर्वांत त्या बिचाऱ्या बालकांचा काय दोष? अजूनही डॉक्‍टर सपं मागे घेऊन अनेक बालकांचे प्राण वाचवू शकतात.

1 comment:

Anonymous said...

halla zala tar kay court shishkha karnar tya MLA la?
kaydyachi sadya paristhiti baghata te kahi shakya nahi..
ek hou shakate.. jya mulancha mrutyu zala tyanchya natevaikanni tya MLA la cha kay to nyay karava..
Asha murkha legislators mulech bhartachi ashi sthiti ahe..