Sunday, May 20, 2007

विहीरीचे संवर्धन - Reader Writes



मुबंईच्या महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी " मुबंईतील या जुन्या विहीरीचे योग्य प्रकारे जतन आणि संवर्धन केले गेले पाहिजे, अशी अपेक्षा महापौर्पद स्विकारताना व्यक्त केली आहे.

लोकसहभाग, नगरसेवक श्री. नितीन सलागरेचा पुढाकार, मुबंई महानगरपालिका, व तिचे अधिकारी श्री सुभाष दळवी यांनी एकत्रपणे महानगरपालिकाच्या दत्तक वस्ती योजने अंतर्गत, महात्मा कबीर नगर, सहार रोड, अंधेरी येथील कचऱ्यानी, गाळानी, पुर्ण भरलेली विहिर दि. २०-०४-०७ ते २३-०४-०७ या केवळ दोन-तीनच दिवसात संपुर्णपणे साफ करुन मुंबई समोर एक आदर्श उभा केला आहे. समाजातील हे सर्व घटक एकत्र येतात तेव्हा जे काही घडते तो चमत्कारच असतो. दोन दिवसात आयुष्यभर कचरा सहन करणारी बिहीर अचानक मोकळा श्वास घेवु लागली आहे, आता तीचा कायमस्वरुपी लाभ घेणार ते जागे झालेले तेथेलेच रहीवासी.

अश्या प्रकारचे पाण्याचे पारंपारीक स्त्रोत, विहीरी, तलाव, तळी, साफ करुन वापरात आणले गेले तर स्थानीक पातळीवरच्या पाण्याच्या समस्या काही प्रमाणात दुर होवु शकतात. या प्रकारचे प्रयत्न तर सर्वत्र व्हायला हवे आहेत.

-- rajabhau mumbaikar